Friday, November 4, 2011

आशा


दीसामागून दीस गेले, वाट पहाणे संपले नाही,
पाण्याशिवाय तहानेने जीव जाणे संपले नाही.

नुसताच एक काळा ढग आशा दाखवून गेला,
जाता जाता डोळ्यात मात्र पाणी आणून गेला.

भेगाळलेली जमीन आणि तहानलेले लेकरू,
पाण्याच्या आशेने बघा तळमळतंय वासरू

सुर्याच्या उन्हाने अंगाची झाली आहे लाही
घशाला आता कोरड पण पडत नाही

अशीच वाट पहात बसायचे, तीळ तीळ मरायचे
कधीतरी पाऊस येईल अशा आशेवर जगायचे

No comments: