Saturday, February 5, 2011

एका चांगल्या scriptच्या शोधात....खरंच?

माधुरी दिक्षित, ऊर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे आणि मुग्धा गोडसे या सर्वांमधे काय साम्य आहे? त्या "मराठी मुली" आहेत, चौघीही "बॉलीवुड" मधे आहेत etc etc. पण या चौघींमधे अजून एक साम्य आहे, सर्वजणींना मराठी चित्रपटात काम करायचे आहे. पण एक मोठ्ठा कॉमन प्रॉब्लेम आहे... चांगले script मिळत नाही आहे.

माधुरीने हे पूर्वीच म्हटले होते, पण आता बाकिच्या तिघींनी पण तीच री ओढली आहे. (महाराष्ट्र टाईम्स, पुणे एडिशन)

आता मराठीमधे एव्हढे चित्रपट येत आहेत, आणि काही काही खरंच चांगले आहेत. मग यांनाच का मिळू नये? माधुरीला तर नाटकात पण काम करायचे आहे!! खरा प्रॉब्लेम असणार आहे पैशाचा.. माधुरीच्या मानधनाच्या रकमेत तर आख्खा मराठी चित्रपट तयार होईल.

का आता असे पण आहे? मराठी चित्रपटसृष्टीने आता बरीच मजल मारली आहे, बरेच चांगले चित्रपट आले आहेत, येत आहेत, चांगल्या कलाकारांची संख्या पण लक्षणीय आहे. आणि म्हणून मराठी निर्मात्यांना या "सुपरस्टार्स"ची गरज वाटत नाही?

बहुधा दोन्ही बरोबर असावे :)

No comments: